परदेशात राहणारे भारतीय ही आता नवीन गोष्ट राहिली नसली, तरी अद्याप त्यांच्या विषयीचे कुतूहल कायम आहे. कारण त्यांना येणाऱ्या अनुभवांचे वेगळेपण आणि त्यांचे आचार-विचार हे त्या कुतूहलास कायम आहे. कारण त्यांना येणाऱ्या अनुभवांचे वेगळेपण आणि त्यांचे आचार-विचार हे त्या कुतूहलास कारणीभूत ठरतात.
दुबई-अबुधाबी आणि दोहा यांसारख्या ठिकाणी १५-१६ वर्षे राहून भारतात वास्तव्यापोटी परतलेले अंजली आणि शैलेश हे जोडपे या कुतूहलापेक्षाही अधिक उत्सुकता वाढवणारे आहे. ही उत्सुकता अंजली शैलेश यांच्या या पुस्तकातून शमतेही! पुण्यातला संसार अबूधाबीला मांडला जातो, तेथपासून या प्रवासाला सुरुवात होते. तिथल्या आयुष्याची सवय होईपर्यंतची धडपड आणि नंतरचे सरावलेपण समोर येते; मात्र प्रतिष्ठेच्या नोकऱ्या, झगमगाट सोडून हे जोडपे मायदेशी परतते. या परतण्याची ही गोष्ट आहे.
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
पाने : १२८
किंमत : २५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)